घाईगडबडीने टेबल वरील पसारा पुन्हा आवरला आणि घड्याळाकडे इक नजर टाकली....
मनात विचार सेकंदाच्या काट्याप्रमाणे फिरुलागले...आजच्या दिवसाचा पूर्ण मागोवा घेत मी संध्याकाळच्या ६:३० वाजेपर्यंत पोहचलो....
बोस नुकताच बाहेर निघाले होते. त्यामुळेच आज लवकर जाण्याची संधी होती...मी लगबगीने माझी बाग pak केली...मनात खूप विचार सत्वयाचे.काय केले आपण का engineer झालो आपण ? "अरे समीर आवरालास ?" मी समीरला बोललो
" हो चाल निघू " समीर उत्तरला....आम्ही दोघेही लिफ्टच्या दिशेला गडबडीने निघालो...." राजे ६:४५ ची लोकल मिळेल ना ? " समीरने मला विचारले "हो ना मिळेल ना चाल आपण आज रिक्षा करू.." मी बोललो ....त्याचे प्रश्न ऐकून मला नेहमी वाटे...काय हे आपले जीवन...घडल्याच्या काट्यावर सर्व...सकाळी ८:२० ची लोकल, संध्याकाळी कधी ६:४५, कधी ७:३०, कधी ८:३० कधी ११:००.....सर्व लोकलचे वेळापत्रक तोंडावर पाठ....ऑफिसमध्ये पोचल्यावर आज कुठे कोणते काम झाले, होणार आणि किती करायचे म्हणचे बांधकामाची आमची कंपनी हो आणि आम्ही सिविल अभियंते हो...मी या कंपनीमध्ये दोन वर्ष्यापूर्वी रुजू झालो...अगदी रिसेशन च्या काळात.. कमी पगार वरून कंपनीलाही लवकर कामाचे पेमेंट्स मिळत नाहीत...त्यामुळे सर्व काही देव्भारोसे सुरु आहे....!!
गावाकडच्या घरी जायला आई वडिलांना इकडे तिकडे फिरवायला वेळचा नाही....!! मी स्वताला आणि आपल्या इच्छांना मारून पैसे साठवायचे
सर्व काही न सुटणाऱ्या कोड्य प्रमाणे सुरु आहे....रेल्वे मध्ये दररोज किती लोकांना पाहतो ....!! इथे एक वेगळीच संस्कृती जपली जाते...!!
Wednesday, May 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment